ह्या कवितासंग्रहामध्ये कवीने आपल्या जीवनातील अनुभव व्यक्त केले आहेत. आपल्या जीवनात बऱ्याच गोष्टी घडत असतात पण आपण थोड्या वेळांकरीता त्यांचा विचार करतो आणि विसरुन जातो. पण कवीने आपल्या सुंदर लेखणाने त्यांच्या जीवनातील काही अनुभवांचे खूप सुंदररीत्या वर्णन करून त्यांच एक वेगळ अस्तित्व निर्माण केलं आहे. कवीला विश्वास आहे की हे त्यांचे अनुभव नक्कीच वाचकांच्या हृदयात आपले एक वेगळे स्थान निर्माण करतील.